🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

जेजुरी Wari Accident: आषाढी पालखी सोहळ्यात ट्रक दिंडीत घुसला; सांगलीच्या 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू, 15 हून अधिक जखमी

 

AI Image

चांगभलं वृत्तसेवा | जेजुरी
Ashadhi Wari 2026 दरम्यान पुणे जिल्ह्यातील जेजुरी येथे सोमवारी सकाळी अत्यंत दुर्दैवी अपघात घडला. ज्ञानोबा-तुकारामांच्या गजरात पंढरपूरकडे निघालेल्या वारकऱ्यांच्या दिंडीत भरधाव ट्रक घुसल्याने तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाला, तर 15 ते 16 वारकरी जखमी झाले. या घटनेने संपूर्ण Wari सोहळ्यावर शोककळा पसरली आहे.
Saswad–Jejuri Road वर भीषण अपघात
प्राथमिक माहितीनुसार, सासवड-जेजुरी मार्गावरील भोंगळे मळा परिसरातून ज्ञानोबा माऊलींच्या पालखीसोबत वारकरी पायी प्रवास करत होते. त्याचवेळी वारीचा शिधा व साहित्य घेऊन जाणारा ट्रक अचानक अनियंत्रित होऊन थेट दिंडीत घुसला. धडकेची तीव्रता इतकी होती की अनेक वारकरी रस्त्यावर फेकले गेले आणि घटनास्थळी एकच गोंधळ उडाला.
तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू
या भीषण अपघातात राजश्री शंकर भोसले, माधवी राजाराम सरवडे आणि नंदा पवार या तीन महिला वारकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तिन्ही महिला सांगली जिल्ह्यातील असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे सांगलीसह संपूर्ण वारकरी संप्रदायात शोक व्यक्त केला जात आहे.
15 हून अधिक वारकरी जखमी
अपघातातील जखमी वारकऱ्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
ट्रक वारीच्या शिध्यासाठी
अपघातग्रस्त ट्रक हा नांदेड जिल्ह्यातील असून तो वारीसाठी आवश्यक शिधा व साहित्य घेऊन जात होता. चालकाचे वय सुमारे 70 वर्षे असल्याची माहिती समोर आली आहे.
चालकाला ग्लानी आल्याचा प्राथमिक दावा
स्थानिक लोकप्रतिनिधींनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रक चालकाने तापाच्या गोळ्या घेतल्यामुळे त्याला ग्लानी आली आणि वाहनावरील नियंत्रण सुटल्याचा प्राथमिक दावा करण्यात आला आहे. मात्र, अपघाताचे नेमके कारण काय होते, याचा तपास पोलीस आणि संबंधित यंत्रणा करत आहेत.
Police Investigation सुरू
घटनेनंतर पोलीस, प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. वाहतूक व्यवस्था, सुरक्षा उपाययोजना आणि ट्रक अनियंत्रित होण्यामागील कारणांचा सखोल तपास सुरू करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलेय


मृत वारकऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाखांची आर्थिक मदत जाहीर 


या दुर्घटनेनंतर राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी जेजुरी येथील रुग्णालयात जाऊन जखमी वारकऱ्यांची भेट घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी त्यांनी मृत वारकऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 4 लाखांची आर्थिक मदत जाहीर केली. तसेच, सर्व जखमींवर मोफत उपचार करण्यात येतील, अशी घोषणाही त्यांनी केली.


दुर्घटना अत्यंत वेदनादायी आणि मन हेलावून टाकणारी...


" आज सासवड-जेजुरी मार्गावर झालेली दुर्घटना अत्यंत वेदनादायी आणि मन हेलावून टाकणारी आहे. या अपघातात ज्या तीन वारकरी भगिनींचा दुर्दैवी मृत्यू झाला, त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहे. जखमी वारकरी भगिनींची रुग्णालयात जाऊन भेट घेतली असून त्यांच्या उपचारात कोणतीही कमतरता राहणार नाही, याबाबत जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत. शासन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे.
पंढरीच्या वाटेवर निघालेल्या वारकऱ्यांची सुरक्षितता ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. त्यामुळे सर्वांनी वाहन चालवताना चालणाऱ्या वारकऱ्याची काळजी घ्यावी.
जखमी भगिनी लवकर बऱ्या व्हाव्यात, हीच विठ्ठल चरणी प्रार्थना!"
- श्रीमती सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री.

अशा दुर्घटना टाळण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे


Rohit Pawar यांची प्रतिक्रिया


शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. "जेजुरीजवळ दिंडीतील वाहनाच्या धडकेत तीन वारकऱ्यांचा मृत्यू होणे अत्यंत वेदनादायी आहे. जखमी वारकरी लवकर बरे व्हावेत, ही विठुरायाच्या चरणी प्रार्थना. या दुर्घटनेची सखोल चौकशी करून भविष्यात अशी घटना पुन्हा घडणार नाही, यासाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात," अशी मागणी त्यांनी केली.
राज्यभरातून हळहळ
Ashadhi Ekadashi, Pandharpur Wari आणि पालखी सोहळा हा महाराष्ट्राच्या भक्तीपरंपरेचा आत्मा मानला जातो. अशा पवित्र यात्रेदरम्यान घडलेल्या या दुर्दैवी अपघातामुळे राज्यभरातून हळहळ व्यक्त केली जात असून वारकऱ्यांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत.



🎥 व्हिडिओ:

आषाढी वारीतील अपघातामध्ये जखमी झालेल्या वारकऱ्यांची जेजुरी रुग्णालयात उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी भेट घेऊन विचारपूस केली. जखमींच्या प्रकृतीची माहिती घेत त्यांनी डॉक्टरांशी चर्चा केली तसेच आवश्यक त्या सर्व उपचारांची व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या.
➖➖➖➖➖➖

Jejuri Wari Accident, Ashadhi Wari 2026, Warkari Accident, Jejuri Breaking News, Pandharpur Wari, Ashadhi Ekadashi News, Truck Accident Jejuri, Sangli Warkari, Maharashtra Breaking News, Palakhi Sohala, Warkari News Marathi, Changbhala News

Tags

Jejuri, Wari Accident, Ashadhi Wari 2026, Pandharpur Wari, Breaking News, Maharashtra News, Pune News, Sangli News, Warkari, Truck Accident, Palakhi Sohala, Ashadhi Ekadashi, Changbhala News

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या