कराड प्रतिनिधी | चांगभलं वृत्तसेवा
आजच्या स्पर्धात्मक युगात यशाची एकच व्याख्या नसून प्रत्येक व्यक्तीची गुणवत्ता, आवड व क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे गुणवत्तेचे परिमाणही वेगवेगळे असतात, असे प्रतिपादन ॲड. भारत मोहिते यांनी केले. कासेगाव शिक्षण संस्थेच्या ब्रह्मदास विद्यालय, बेलवडे बुद्रुक येथे आयोजित जयंत करिअर सप्ताहातील दुसऱ्या पुष्पात ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते.
प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये काही ना काही विशेष गुण असतात. कोणी अभ्यासात प्रावीण्य मिळवतो, तर कोणी कला, क्रीडा, तंत्रज्ञान किंवा व्यवसायात आपली वेगळी ओळख निर्माण करतो. त्यामुळे स्वतःच्या गुणवत्तेची ओळख करून ती विकसित करणे महत्त्वाचे आहे, असे त्यांनी सांगितले. केवळ गुणपत्रिकेतील मार्क्स म्हणजेच गुणवत्ता नसून, कौशल्य, आत्मविश्वास, मेहनत व चिकाटी यालाही तितकेच महत्त्व आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
आज नोकरीबरोबरच व्यवसाय, स्वयंरोजगार, स्टार्टअप्स यांसारख्या विविध संधी उपलब्ध आहेत. आपल्या गुणवत्तेनुसार योग्य क्षेत्र निवडल्यास यश निश्चित मिळते. अपयश आले तरी खचून न जाता त्यातून शिकून पुढे जाणे गरजेचे आहे, असेही भारत मोहिते यांनी नमूद केले.
विद्यालयाचे मुख्याध्यापक जे. बी. माने यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांनी स्वतःमधील सुप्त गुण ओळखून त्यांना योग्य दिशा द्यावी. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढून भविष्यातील करिअरविषयी स्पष्टता येते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी. डी. पोरे यांनी केले तर आभार प्रदर्शन एस. डी. वाबळे यांनी मानले.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
#JayantCareerWeek #CareerGuidance
#QualityOfEducation #StudentMotivation
#BrahmdasVidyalaya #KasegaonEducation
#KaradEducation #YouthGuidance
#SkillDevelopment #SelfConfidence
#ChangbhalaNews #EducationalNews
#CareerAwareness #FutureReadyStudents

0 टिप्पण्या