शेतकऱ्यांतून समाधान; ऊसदराबरोबरच ऊस बिल वाटपातही ‘जयवंत’चा पुढाकार
कराड, प्रतिनिधी|दि. ३ डिसेंबर २०२५|चांगभलं वृत्तसेवा
धावरवाडी (ता. कराड) येथील जयवंत शुगर्सने गळीत हंगाम २०२५-२६ मध्ये पहिल्या पंधरवड्यात गाळपास आलेल्या उसाचे प्रतिटन ३५०० रुपयांप्रमाणे एकूण ३५.१६ कोटींचे बिल, ऊसपुरवठा केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त केले जात आहे.
जयवंत शुगर्सचे संस्थापक डॉ. सुरेश भोसले यांनी जिल्ह्यात सर्वांत प्रथम ऊसदराची कोंडी फोडून प्रतिटन ३५०० रुपयांचा दर जाहीर करत ऊसदरात आघाडी घेतली. आता जयवंत शुगर्सने ऊसबिल वाटपातही आघाडी घेत, जिल्ह्यात साखर कारखानादारीत अनोखा आदर्श घालून दिला आहे. कारखान्याने पहिल्या पंधरवड्यात गाळपास आलेल्या ऊसापोटी प्रतिटन ३५०० प्रमाणे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर एकूण ३५ कोटी १६ लाख रुपये जमा केले आहेत.
जयवंत शुगर्सने नेहमीच शेतकरी केंद्रित धोरणे घेत आणि व्यवस्थापनातील सातत्य ठेवत ऊस उत्पादकांमध्ये विश्वास निर्माण केला आहे. तसेच कारखान्याचे संस्थापक डॉ. सुरेश भोसले यांनी ऊस उत्पादकांना चांगला दर देत, वेळेत ऊस बिल जमा करण्याची परंपरा जोपासली आहे. पहिल्या पंधरवड्याचे बिल ऊस उत्पादकांच्या बँक खात्यावर जमा झाल्याने, शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आधार लाभला आहे. त्यामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.
#JaywantSugars #UsBill #SakharKarkhana #KaradNews #ChangbhalaNews #DrSureshBhosale #Usadar3500 #SugarcaneFarmers #UsUtpadak #SataraNews #MaharashtraAgriculture #UsGaḷit2025 #FarmersUpdate #JaywantSugarsNews

0 टिप्पण्या